वादळ आणि तेही मनातल्या विचारांचं...
सगळ्यांच्याच मनात ही विचारांची वादळं अगदी वारंवार येत असतात. आपण कितीही कामात गुंतलेले असलो तरी खूप वेळा मनात काही वेगळेच विचार सुरु असतात. कधी कधी विचारांचं हे वादळ एवढं जोरदार असतं कि हातातलं कामही बाजूला ठेवून आपल्याला त्या वादळाला संयमाने शांत करावं लागतं. अर्थात सारं काही छान मनासारखं घडेल या आशेवरच ते वादळ शमतं.
मनातल्या विचारांचं वादळ कधी शमेल का
सारं काही अगदी मनासारखं कधी घडेल का
आयुष्याच्या पडद्यावर मनासारखं चित्र साकारेल का
कल्पनेच्या कुंचल्यातून सप्तरंग तयात भरतील का
नातीगोती अन मैत्री निरंतर जपता येईल का
क्षणी सुखदुःखाच्या साथ सर्वाची लाभेल का
चालताना तमातुनी संगतीस कुणी असेल का
तिमीरातूनी तेजाचे त्या भाग्य कधी लाभेल का
तप्त रणातूनी सदैव चालणे कधी संपेल का
बरसूनी अमृतधारा तनमन तृप्त होईल का
झोपेतल्या जगी सुखस्वप्ने कधी दिसतील का
सत्यातल्या जगी स्वप्नपुर्ती सारी होईल का
मनातल्या विचारांचं वादळ कधी शमेल का
सारं काही अगदी मनासारखं कधी घडेल का
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment